आज १ जुलै महराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो
त्यानिमित शेतकरीची व्यथा मांडणारी हि कविता
काय करू कूटं जाऊ
काय बी कळंना
कुनास साद घालू कसी घालू
काय बी सुधरंना
रोजच्याला घाम गाळून
जातो श्येतात कामसनी
राब राब राबुन करतो
त्यात धान्यांची पेरनी
साऱ्या जगासनी अन्न धान्य पुरवितो
अन मी स्वतः मात्र उपाशीच मरतो
धन्यासनीच सारा पैसा मिलतो
अन आमचे श्येत असूनही आम्ही मात्र कर्जात बुडतो
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास महनून की काय
इन्दरदेव ही त्यात भर टाकतो
ऐन पिकाच्या येळीच हा
अगदी धो धो धो धो कोसळतो
आता निसर्गराजा बी कोपला म्हंतल्यावर
आम्ही तरी जायाचं कूटं
याचे कारण इचारावं म्हनून
'त्या'च्याकडचीच वाट पकडतो
बळीराजा बळीराजा महन्ता महन्ता
ह्या राजाचा फकस्त बळीच जातो
बळीराजाचा धनीराजा कर
असच देवासनी जाऊन सांगेन महन्तो
- केतकी कुलकर्णी
त्यानिमित शेतकरीची व्यथा मांडणारी हि कविता
काय करू कूटं जाऊ
काय बी कळंना
कुनास साद घालू कसी घालू
काय बी सुधरंना
रोजच्याला घाम गाळून
जातो श्येतात कामसनी
राब राब राबुन करतो
त्यात धान्यांची पेरनी
साऱ्या जगासनी अन्न धान्य पुरवितो
अन मी स्वतः मात्र उपाशीच मरतो
धन्यासनीच सारा पैसा मिलतो
अन आमचे श्येत असूनही आम्ही मात्र कर्जात बुडतो
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास महनून की काय
इन्दरदेव ही त्यात भर टाकतो
ऐन पिकाच्या येळीच हा
अगदी धो धो धो धो कोसळतो
आता निसर्गराजा बी कोपला म्हंतल्यावर
आम्ही तरी जायाचं कूटं
याचे कारण इचारावं म्हनून
'त्या'च्याकडचीच वाट पकडतो
बळीराजा बळीराजा महन्ता महन्ता
ह्या राजाचा फकस्त बळीच जातो
बळीराजाचा धनीराजा कर
असच देवासनी जाऊन सांगेन महन्तो
- केतकी कुलकर्णी